श्रीसद्गुरू हे सर्व विश्व व्यापून राहिलेले असतात. सद्गुरू तत्व हे सूक्ष्माहून सूक्ष्मात व्याप्त असतं , ते आगम-निगमाच्या पलीकडे चिरंतन , शाश्वत असतं. सर्वसामान्य माणसानी त्याच्या दैनंदिन जीवनात निर्भीड , आनंदी व समाधानी व्हावं आणि त्याबरोबरच त्यानी स्वतःची खरी ओळख करून घ्यावी यासाठी हे सद्गुरू तत्व वेळोवेळी , वेगवेगळ्या रूपात या भूमीवर अवतरित होऊन कार्यरत असतं. प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज हे असंच एक सद्गुरू तत्व आहे , ज्यांचे लाखो अनुयायी / भक्त आहेत , जे आपल्या व्यावहारिक तसंच आध्यात्मिक जीवनात आनंदी , समाधानी झाले आहेत. प.पू.श्रीकाका महाराज म्हणतात , “परमेश्वराच्या अखंड नामस्मरणाने आणि श्रीसद्गुरूंनी आखून दिलेल्या रस्त्यावर मार्गक्रमण केल्याने मनुष्याला शाश्वत आनंदाची ओळख होते आणि तो समाधानी होतो.”
आमचे सद्गुरू, प.पू.श्रीकाका महाराज १९७५ सालापासून मानवसेवेचं कार्य करत आहेत. ते आपल्या प्रवचनांमधून रंजलेल्या – गांजलेल्यांना , जे जीवनात निराश झाले आहेत , दुःखी आहेत , या स्पर्धेच्या युगात जे थकले आहेत , ज्यांना दिशा सापडत नाहीये अशांना मार्गदर्शन करतात. ते सांगतात , “प्रत्येकानी व्यवहार आणि आध्यात्म यांची सांगड घालून आपलं दैनंदिन जीवन जगलं पाहिजे. अखंड नामसाधना , सद्गुरूंवरील निष्ठा , सद्गुरूंची शिकवण आणि सत्संग यांचा अंगीकार करून माणूस आनंदी व निर्भय होतो आणि त्याला अखंड मनःशांती व चिरंतन समाधानाची प्राप्ती होते. आजच्या ताणतणावाच्या आणि भयग्रस्त जीवनशैलीत माणसाला सत्संगाची नितांत आवश्यकता आहे.”
प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज यांचा जन्म कोकणातील ’आंजर्ले’ या छोट्याशा खेड्यात , दत्तजयंतीच्या पावन दिवशी झाला. एका चित्पावन ब्राम्हण कुटुंबात , श्री. अनंत वैद्य व सौ. उषा वैद्य या दांपत्याला ’श्रीपाद’ (श्रीकाका महाराज)च्या रूपात ज्येष्ठ पुत्राची प्राप्ती झाली. या वैद्य घराण्यात पिढीजात दत्तोपासना चालत अलेली असल्याने छोट्या श्रीपादलाही वयाच्या चौथ्या वर्षापासून दत्तभक्तीची ओढ निर्माण झाली. श्रीकाका महराजांचे बालपण अतिशय कष्टमय गेले. अत्यंत हालाखीच्या , खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत श्रीकाका महाराजांनी उत्तम शिक्षण घेऊन अभियंत्याची पदवी संपादन केली. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळवली. १९७३ साली श्रीकाका महाराजांचा विवाह , जयश्री शंकर दामले यांच्याशी झाला. याच काळात श्रीकाका महाराजांच्या परिवारावर एक मोठं संकट कोसळलं. अतिशय प्रतिकूल आणि भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसताना , वैद्य परिवाराची भेट प.पू.श्रीगडबोले महाराज (श्रीकाका महाराजांचे प.पू.श्रीसद्गुरू) यांच्याशी झाली. प.पू.श्रीगडबोले महाराजांनी श्रीकाका महाराजांच्या परिवाराला त्या विचित्र संकटातून लीलया बाहेर काढलं.
प.पू. श्रीगडबोले महाराजांच्या भेटीनंतर श्रीकाका महाराजांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. प.पू.श्रीगडबोले महाराजांनी आपल्याकडील दिव्य सामर्थ्य श्रीकाका महाराजांना देण्याची इच्छा बोलून दाखवली. ते श्रीकाका महाराजांना म्हणाले , “मी तुझी गेली १००० वर्षे वाट पहात आहे.” श्रीकाका महाराजांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. १९७५ साली श्रीगडबोले महाराजांनी श्रीकाका महाराजांना दीक्षा दिली. त्या क्षणापासूनच श्रीकाका महाराजांनी , आपल्या श्रीसद्गुरूंचं मानवसेवेचं कार्य हेच आपलं जीवितकार्य मानलं. १९७५ सालीच , श्रीसद्गुरूंच्या आज्ञेनुसार श्रीकाका महाराजांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते कोकणातल्या त्यांच्या आंजर्ले या गावी वास्तव्यास गेले. कोकणात ७ वर्षे त्यांनी , सद्गुरूंनी सांगितलेली तीव्र साधना केली. कोकणातही त्यांनी हजारो रंजल्या – गांजलेल्यांना मार्गदर्शन करून दुःख्मुक्त केलं. या मधल्या काळात त्यांना दोन कन्यांची प्राप्ती झाली. १९८१ साली श्रीकाका महाराज परिवारासह पुण्यास परत आले. त्यानंतर काही महिन्यांतच श्रीकाका महाराजांचे सद्गुरू , प.पू.श्रीगडबोले महाराजांनी देह ठेवला.
पुण्याला आल्यावर , बिकट परिस्थितीतून काळ क्रमत असतानाही श्रीकाका महाराजांनी मानवसेवेचं , लोककल्याणाचं आपलं व्रत अखंड चालू ठेवलं. १९८६ साली त्यांनी पुण्यात , आनंदनगर येथे छोटंसं घर बांधलं. १९८७ साली , श्रीदत्तगुरुंच्या द्रुष्टांतानुसार , आपल्या घराच्या आंगणात एका दत्तमंदिराची स्थापना केली. तसच १९८८ साली श्रीसांईबाबांच्या द्रुष्टांतानुसार घराच्या वरच्या बाजूला श्रीसांईमंदिराची स्थापना केली. श्रीमहाराजांच्या या मंदिरात जात - पात , धर्म - पंथ , उच्च – नीच , गरीब – श्रीमंत अशा कोणत्याही भेदभावाला जागा नाही. तसेच कर्मकांडं , अवडंबर , अंधश्रध्दा , सोवळं – ओवळं यांना स्थान नाही. स्वतः श्रीकाका महाराज कोणत्याही संप्रदायाचं किंवा पंथाचं समर्थन करत नाहीत.
श्रीकाका महाराजांकडे ; विविध समस्यांवर , प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांना आध्यात्माची , ईश्वरभक्तीची गोडी लागावी या हेतूने श्रीमहाराजांनी त्यांच्या सांईमंदिरात आरती , भजन , सत्संग इत्यादी कार्यक्रम सुरु केले.
मंदिरात येणा-या अनेक लोकांना श्रीमहाराजांनी अघोरी चाली-रीती , समजूती , अंधश्रध्दा इत्यादींमधून बाहेर काढले. भोंदू बाबा , बळी देणे वगैरे अघोरी व अमानवी प्रथांपासून पराव्रुत्त केले आणि त्यांना जीवनाकडे बघण्याचा नवा द्रुष्टीकोन दिला. सोवळं-ओवळं , कर्मकांडाचे अवडंबर यांमधे अडकलेल्या कित्येक भयग्रस्त लोकांना त्यांच्या भीतीतून बाहेर काढलं व त्यांना नामसाधनेकडे वळवले. कित्येक लोकांना व्यसनातून मुक्त केले. १९७५ साली श्रीमहाराजांनी घेतलेले जनकल्याणाचे असिधारा व्रत अखंड , अविरत सुरु आहे. स्वतः खडतर मार्ग क्रमत असतानाही , दुस-यांना जीवनमार्ग सोपा - सुगम होण्यासाठी मार्गदर्शन केले , मानसिक आधार दिला , सकारात्मक द्रुष्टीकोन दिला , अनेक निराश मनांना जीवनाची नवी दिशा दिली.
प. पू. श्री. गडबोले महाराज
प.पू.श्रीकाका महाराजांचे सद्गुरू , प.पू.श्रीगडबोले महाराज हे मूळचे कोकणातले. बालपणीच , म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षीच ते कोकण सोडून पुण्याला आले. अत्यंत खडतर परिस्थितीत , अतिशय कठीण परिश्रमांनी जीवन निर्वाह करीत असताना लहान वयातच त्यांना जीवनाचे गूढ शोधण्याची ओढ लागली. आणि त्यासाठी त्यांनी , पुण्यातील पाताळेश्वर येथे १२ वर्षे तीव्र साधना केली. कठीण साधनेच्या मुशीतून तावून-सुलाखून प.पू.श्रीगडबोले महाराजांची साधना सिध्द झाली , त्यांच्या साधनेला सोन्याची झळाळी आली.
त्यानंतर श्रीगडबोले महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठीच वेचले. आयुष्यभर आपला देह लोकांसाठी झिजवला. त्यांनी कित्येकांचे अश्रू पुसले , असंख्य लोकांना दुःखमुक्त करून आनंदी व समाधानी केले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक व प्रसन्न होते. त्यांची विचारधारा अतिशय सकारात्मक आणि पुरोगामी होती.
१९८१ साली, आषाढी एकादशीला , वयाच्या १०५ व्या वर्षी प. पू. श्रीगडबोले महाराजांनी देह ठेवला.
प. पू. सदà¥à¤—à¥à¤°à¥‚नाथ शà¥à¤°à¥€à¤•ाका महाराज मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ , “मनà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ कधीच संपत नाहीत. येणा-या पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤‚पासून , संकटांपासून दूर पळून न जाता , तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤‚ना , संकटांना समरà¥à¤¥à¤ªà¤£à¥‡ तोंड देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ , तà¥à¤¯à¤¾à¤‚चा सामना करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ , तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° मात करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¤à¥€ , साहस नामसाधनेनेच पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होते. ती शकà¥à¤¤à¥€ अंधशà¥à¤°à¤§à¥à¤¦à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ाने , तंतà¥à¤°-मंतà¥à¤° , अघोरी पà¥à¤°à¤¥à¤¾-परंपरा-साधना , दà¥à¤¸-यांना तà¥à¤°à¤¾à¤¸ देऊन अथवा बळी-उतारे देऊन येत नाही , हे सरà¥à¤µ अमानवी उपाय आहेत. केवळ नामसाधना हाच सरà¥à¤µà¤¾à¤¤ शà¥à¤°à¥‡à¤·à¥à¤ , सोपा मारà¥à¤— आहे. नामसाधनेचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ानी तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤‚ना बरोबर घेऊन , आनंदाने व निरà¥à¤à¥€à¤¡à¤ªà¤£à¥‡ जीवन जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कला सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ शिकवतात.”
तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° शà¥à¤°à¥€à¤•ाका महाराज मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ , “माणसाने माणसाशी माणसासारखे वरà¥à¤¤à¤¨ ठेवावे. सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤–ाबरोबर दà¥à¤¸-यांचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤–ाचाही विचार केला पाहिजे. दà¥à¤¸-यांचà¥à¤¯à¤¾ चेह-यावरचा आनंद बघून आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ होणारा आनंद हाच खरा आनंद असतो. आणि हा आनंद मिळवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लागणारी विचारधारा , मनोवसà¥à¤¥à¤¾ ही सतà¥à¤¸à¤‚गानीच पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होते. तसेच , आजचà¥à¤¯à¤¾ तणावगà¥à¤°à¤¸à¥à¤¤ , अनिशà¥à¤šà¤¿à¤¤à¤¤à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ काळात केवळ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंचा सतà¥à¤¸à¤‚गच माणसाला à¤à¤¯à¤®à¥à¤•à¥à¤¤ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मारà¥à¤— दाखवतो.”
जसे संसà¥à¤•ार आई आपलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚वर करत असते, तसेच संसà¥à¤•ार शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ आपलà¥à¤¯à¤¾ शिषà¥à¤¯à¤¾à¤‚वर करत असतात. हे संसà¥à¤•ार करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारà¥à¤¯ करत असतांना ते आपलà¥à¤¯à¤¾ शिषà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शà¥à¤°à¤§à¥à¤¦à¤¾ बळकट करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम करत असतात.
जातà¥à¤¯à¤¾à¤µà¤° धानà¥à¤¯ दळत असतांना जो खà¥à¤‚टा हातात धरून जाते फिरवायचे असते, तो बळकट असावा लागतो, मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š तो जातà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ घटà¥à¤Ÿ बसवावा लागतो. तरच ते धानà¥à¤¯ दळून होते. नà¥à¤¸à¤¤à¤¾ दळणारा बळकट असेल अगर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ दळणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾ बळकट असेल, तरीही बळकट व घटà¥à¤Ÿ खà¥à¤‚टà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ धानà¥à¤¯ दळले जात नाही.
तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी खà¥à¤‚टà¥à¤¯à¤¾ खाली नारळाची शेंडी घालून मग तो घटà¥à¤Ÿ बसवतात. शिषà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जीवनात अनेक चांगले वाईट पà¥à¤°à¤¸à¤‚ग येतात, तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤‚गात तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ं कडून मिळालेले मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ व आधार याचà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तो शà¥à¤°à¤§à¥à¤¦à¥‡à¤šà¤¾ खà¥à¤‚टा बळकट व मजबूत à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ असतो. à¤à¤•दा का हा शà¥à¤°à¤§à¥à¤¦à¤¾ रूपी खà¥à¤‚टा मजबà¥à¤¤ व बळकट à¤à¤¾à¤²à¤¾ की मग या जीवनातील अनेक चांगले वाईट पà¥à¤°à¤¸à¤‚ग या à¤à¤µà¤¸à¤¾à¤—रातील जातà¥à¤¯à¤¾à¤¤ सहज à¤à¤°à¤¡à¥‚न जातात. आपण खंबीरपणे व तटसà¥à¤¥à¤ªà¤£à¥‡ हा à¤à¤µà¤¸à¤¾à¤—र पार करतो व आनंदी यातà¥à¤°à¥€ बनतो.
शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ जर नाम घेतलं तर माणूस अंतरà¥à¤¬à¤¾à¤¹à¥à¤¯ पालटतो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आचार-विचार पालटतात. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• कृती ही चांगलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीच होते. नà¥à¤¸à¤¤à¥€ नजरच नवà¥à¤¹à¥‡ तर चेहरापटà¥à¤Ÿà¥€à¤¸à¥à¤§à¥à¤¦à¤¾ बदलते. इतकी ताकद नामात आहे.
नà¥à¤¸à¤¤à¤‚ शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंचà¥à¤¯à¤¾ समोर तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सतà¥à¤¸à¤‚गात बसलं तरी कितीतरी बदल होतो, आणि जर नाम à¤à¤¿à¤¨à¤²à¤‚ आणि नामाची मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंची खरी ओळख à¤à¤¾à¤²à¥€ की à¤à¤•वेळ अशी येते की, “मी नाम घेत आहे की शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚!” ही जाणीवही रहात नाही.
पण दृढ विशà¥à¤µà¤¾à¤¸ हवा, शà¥à¤°à¤§à¥à¤¦à¤¾ बळकट हवी, à¤à¤•दा शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंना आपलं मà¥à¤¹à¤£à¤²à¤‚ की कोणतीही शंका घेऊ नये. अशी धारणा हवी की “शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ जे करतील ते चांगलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीच” ही धारणा पकà¥à¤•ी à¤à¤¾à¤²à¥€, आणि अहंà¤à¤¾à¤µ नाहीसा à¤à¤¾à¤²à¤¾ की नामाची मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š शà¥à¤°à¥€ सदà¥à¤—à¥à¤°à¥‚ंची खरी ओळख होते. आणि ही ओळख à¤à¤¾à¤²à¥€ की समाधान मिळतं, आणि केवळ आनंदच उरतो, जो चिरतन रहातो